अहमदनगर शहरापासून दक्षिणेस 25 कि.मी. अंतरावर सारोळा कासार गाव. शैक्षणिक,सामाजिक,अध्यात्मिक वारसा असलेले. राम नगरकर,वि.द.घाटे,श्री.धो.काळे,मुबारक तांबोळी यासारखे साहित्यिक या भूमीत जन्मले. अभिजीत काळे सारखा क्रिकेट्वीर याच गावचा.कै,विठ्ठल अण्णा धामणे यासारखे समाजकारणी सारोळा कासार भूमीतलेच. ’ शिक्षकांची खाण ’ म्हणून ओळख असलेल्या या गावाने कै.मिठू कडूस,कै ऱाहूल कडूस यांसारखे शहिद जवानही देशासाठी दिले.
अशा या सारोळा कासार गावासाठी अभिमानास्पद असणारी जि.प.प्राथ.शाळा-सुभाषवाडी ही एक क्लास शाळा. 2009 मध्ये सुरु झालेली ही शाळा सुरवातीला ४ वर्षे श्री.भाऊसाहेब लिंभोरे यांच्या घरात भरत होती.जून 2013 मध्ये माझी या शाळेवर नियुक्ती झाली आणि सर्वसाधारण दर्जा असणारी ही शाळा अल्पावधीतच अहमदनगर जिल्ह्यात एक नाविण्यपूर्ण उपक्रम राबविणारी शाळा म्हणून नावारूपास आली.या कामी मला सहकारी शिक्षक कानिफ़नाथ गुंजाळ यांची चांगली साथ मिळाली.
सुरवातीला
शाळेचा दर्जा अगदी सामान्य.म्हणुन काहीतरी
वेगळं करावं यासाठी विविध कल्पना डोक्यात घोळत होत्या.यापूर्वीच्या जुना सारोळा
शाळेचा दांडगा अनुभव होताच.पक्का निश्चय केला. सुभाषवाडी ग्रामस्थांची आर्थिक परीस्थिती तशी चांगली .दानशूर लोकांची कमी नाही.परंतु शाळा नविन, शिक्षक नविन,इमारतीसाठी जागा नाही,जेमतेम
पट.एकंदरीत शाळा बंद पडते की काय अशी अवस्था . अशात लोकवर्गणी जमा होणे जवळ जवळ अशक्यच. शाळेत कुणी
फ़िरकायला तयार नाही. तरी नाउम्मेद न होता लोकांत मिसळलो.माझ्या डोक्यातील कल्पना
सांगितल्या. माझ्या कल्पना व कल्पनेतील शाळा सर्वच सहजासहजी न पटण्यासारख्या. त्यात देणगीची
मागणी यामुळे आणखी दुरावा निर्माण
झाला.आता शेवटचा आधार होता फ़क्त तरुण वर्गाचा.सर्व तरुणांना विनंती केली आणि
शेवटी थोडे तुम्ही टाका आम्ही काही जमा
करतो या अटीवर काम सुरू झाले.
येथील प्रगतशिल शेतकरी श्री.नानाभाऊ कडूस यांच्याकडून 5गुंठे जाग़ा मिळविली,पं.स.सभापती मान.संदेशजी कार्ले,पं.स.सद्स्या मान.सौ. ऱंजनाताई ठोकळ,व तत्कालीन जि.प.सद्स्या कै.शारदाताई भिंगारदिवे
याच्या प्रयत्नातून इमारत मंजूर झाली व 3 च महिण्यात सुसज्ज अशी शाळेची इमारत उभी केली. सौ. रंजनाताई ठोकळ यांच्या प्रयत्नातून शाळेला बाके मिळाली.एक
संगणक,स्वत:चा लॅपटॉप ,स्वाध्याय कार्ड यापासून सुरवात केली.विद्यार्थ्यांचा
संगणक वापर व गुणवत्तेतील अपेक्षित बदल पाहून ग्रामस्थ शाळेत यायला लागले. अडचणी
विचारायला लागले.त्यात माझे प्रेरणास्थान मान. अशोक कडूस साहेब आणि मान. अरूण
धामणे साहेब यांनी माझ्या पूर्वीच्या शाळेचा कामाचा अनुभव पाहता माझ्यावर पूर्ण
विश्वास टाकत ग्रामस्थांना प्रेरीत केले. येथील दानशूर ग्रामस्थांकडून शाळेसाठी रू.1,50,000/-आर्थिक मदत गोळा झाली आणि एकाच वर्षात ग्रामस्थांचा विश्वास आणि आम्हा शिक्षकांची कृतीशिलता यातून जिल्ह्यातील पहीली High-Tech
Activity Based e- learning school उभी राहीली.Interactive projecter,
43 इंची led screen व इनव्हर्टर याच्या मदतीने अध्ययन अध्यापन सुरू झाले. आधुनिक तंत्रज्ञानाचा शिक्षण प्रक्रियेत कसा वापर करता येऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे सुभाषवाडी शाळा हे समिकरण तयार झाले.कमी वेळेत व कमीत कमी श्रमात जास्तीत जास्त उद्दीष्ट्पूर्ती करणे यामुळे सोपे झाले.educational software च्या मदतीने अध्ययन अध्यापन सुकर झाले.गणिती खेळ, e-learning,child
friendly साहित्य,ambition
room,creativity room,सीबीएससी अभ्यासक्रमावर आधारीत Activity software व स्वाध्याय कार्ड,अध्ययन अध्यापन सुकर होण्यासाठी व्हिडीओज,यामुळे एकूणच शिक्षण प्रक्रिया मनोरंजनात्मक होऊन विद्यार्थ्यांची प्रगती होत आहे.दप्तराचे ओझे हळूहळू कमी होत शाळा दप्तरमुक्त कधी झाली हे
कळले देखिल नाही. इंटरनेटच्या माध्यमातून भाषा,गणित,इंग्रजी,भूगोल या विषयाचे अनेक
सॉफ़्टवेअर व Apps डाऊनलोड करून त्यांचा वापर अध्ययन
अध्यापन क्रियेत केला जातोय.याचा फ़ायदा एखादा अवघड घटक समजून घेण्यासाठी होतोय.यातून
विद्यार्थी स्वत:च शिकत आहेत.त्यामुळे आपोआपच शिकण्याचा वेग वाढलाय. याचे फ़लीत म्हणून येथील सर्व विद्यार्थी त्यांच्या इयत्तेच्या पातळीपेक्षा कितीतरी पुढे आहेत.त्याचप्रमाणे त्यांचे इंग्रजी विषयाचे ज्ञान प्रशंसनिय आहे.प्रज्ञाशोध सारख्या परीक्षांमध्ये गुणवत्ता यादीत येथील
विद्यार्थी चमकत आहेत.त्याचाच परीणाम पालक आपल्या मुलांना खाजग़ी शाळांपेक्षा या शाळेत दाखल करण्यास प्राधान्य देत आहेत.या शाळेला आतापर्यंत अनेक अधिकारी,पदाधिकारी यांनी भेटी देऊन सकारात्मक अभिप्राय नोंदविले आहेत.
शाळेचा ब्लॉग
तयार केला असून इतर शाळांना येथील उपक्रम प्रेरणादायी ठरावेत हा या साईटचा उद्देश आहे.या साईटवर असलेले मटेरियल शेअर करण्याचा आम्हा शिक्षकांचा प्रयत्न आहे. जिल्ह्यातील अनेक शिक्षक,ग्रामस्थ,पदाधिकारी,शाळा व्यवस्थापन समिती सद्स्य यांनी भेटी देऊन येथील ऊपक्रम आपापल्या शाळेत राबविण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जिल्ह्यातील सात ते आठ शाळा आपापल्या शाळेत हे उपक्रम राबवत प्रगतीकडे वाटचाल करीत आहेत. माझ्याकडे उपलब्ध शैक्ष.मटेरियल जास्तीत जास्त
शिक्षकांपर्यत पोहोचविण्याचा मानस आहे.
या
कामात मदत व मार्गदर्शन करणारे मान.पी.एस काळे साहेब,मान.शेषराव बडे साहेब,मान.उमेशजी
डोंगरे साहेब,शा.व्य.समिती व सर्व ग्रामस्थ सुभाषवाडी यांचा मी,माझे सहकारी शिक्षक
व माझी चिमुकली टीम सदैव ऋणी राहील.
0 comments:
Post a Comment